Monday, 15 December 2025

प्रिय निलय (भाग - एक )

प्रिय निलय...
खुप दिवसा पासून तुझ्या रिप्लाय ची वाट बघत आहे वाटलं मेल वाचल्यावर तुला माझी ओळख पटली असेल पण अजुन तुझा मला रिप्लाय आला नाही म्हूणन ओळख पटावी यासाठी एक फाईल अटॅच्ड करत आहे वेळ मिळाला तर नक्की मेल वाच.
मान्य आहे आता तु खुप मोठा झाला आहेस तुझ्या पुढे मागे किती तरी लोक गराडा घालून असतात. पण शेवटी तु ही अगदी छोट्या तुन सुरवात केली आहे न मग तु तुझे जुने दिवस जुने लोक कसे विसरू शकतोस.
मोठ असण चूक नाही रे पण मोठ होत असताना आपले पाय जमिनीवर आहेत की नाही हे तरी एकदा तपासाव मान्य आहे आपल्या कडे एकमेकांचे नंबर्स नाहीत पण ई - मेल आय डी तर आहे करावा एखादा मेल.
हरकत नाही तु जसा आहेस तसा माझा प्रिय मित्र आहेस तुला मला रिप्लाय देता नाही आला तरी चालेल पण ती आठवण तरी एकदा पहा.
मला खात्री आहे तुला नक्कीच ओढ वाटेल एका सुंदर नात्याची. बाकी प्रत्यक्ष भेटल्यावर बोलुत.
शेवटी तुझा वेळ महत्वाचा आहे न काळजी घे.
तुझी ओळख न पटलेली.
XXX मैत्रीण 

अरे बाप रे... हा कुठला मेल आहे असा? आणि हा निलय कोण काय आहे याची कहाणी.

स्वप्न वेल निवास...
वेळ सकाळची...

"काय हे कोण मला हा असा मेल करत असत साधं नाव पण लिहीता येत नाही लोकांना." निलय सकाळीच वैतागून म्हणाला 

"असेल कुणी तरी इतकं वैतागून नका जाऊ द्या सोडून कुणी तरी फ्रॅंक केला असेल." राधीने समजावलं 

पण नेमक निलय कोण आहे आणि काय आहे त्याची कहाणी.

भूतकाळात...
मुंबई हायकोर्टात...

"याच वय लक्षात घेता हे नयालय याला बालसुधार गृहात पाठवायची शिक्षा सुनावत आहे." न्या. जगदीश यांनी निर्णय सुनावला.

आणि त्याला बालसुधार गृहात पाठवण्यात आलं.

निलय. साधारण 14 15 वर्षाचा आईविना वाढलेल. पोर. मळकट से अंगावर कपडे केस विसकट लेले फाटलेले कपडे नाकाला लटकलेला शेंमबुड असा त्याचा अवतार. घरी त्याच्यावर वडिलांचे कधी लक्ष नव्हतेच पण सावत्र आई मात्र चांगलेच लक्ष देत असे.

निलय मन मिळाऊ होता समंजस होता त्याने आई गेल्यावर स्वतःला बऱ्यापैकी सावरल होत पण जस तो स्वतःला सावरायला शिकला तस वडिलांनी दुसर लग्न केल आणि त्याच्यासाठी एक सावत्र आई घेऊन आले. मग काय जेवढी मेहनत घेऊन तो सावरला होता ते बघून एका क्षणात त्याच अवसान गळुन पडल. आणि मग रोज त्याची मेल्याहून मेल्यासारखी अवस्था व्हायची.

सुधा आणि सर्जेराव एकाच ऑफिस मध्ये काम करणारे दोघांच आयुष्य ही सारखच सर्जेरावांना निलय हा एकुलता एक मुलगा होता तर सुधाला देखील आनंदी ही एकुलती एक मुलगी होती.

सर्जेरावांना आपली दोन्ही मुलं सारखीच होती त्यांच आपल्या दोन्ही मुलांवर अपार प्रेम होत. पण म्हणतात न "किती ही झाल तरी सख्ख ते सख्खच असत." सर्जेरावांनी दोघांना किती ही प्रेम दिलेलं असेल तरी सुधाला मात्र असच वाटायचं की "ह्यांचं फक्त आणि फक्त निलय वरच प्रेम आहे" आणि याच भावने मुळे ती निलयचा द्वेष करू लागली.

हळू हळू तीने सगळं घर आपला नवरा सगळं काही आपल्या ताब्यात घेतल आणि मग ती म्हणेल ती पूर्वदिशा असा दिनक्रम असायचा.

क्रमशः...

काय निलय एका बाल सुधारगृहात रहात होता? की कथेत अजुन कुठला नवीन ट्वीस्ट आहे बघुत पुढील भागात 

No comments:

Post a Comment

समाधान

डियर सखी... समाधान. हा एकच शब्द मनावरचा सगळा ताण कमी करून टाकतो मन समाधानी असेल तर आयुष्यात सुखाची नांदी होते. कारण कसलच टेन्शन ...